Connect with us

Uncensored मराठी

जेव्हा दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका एकमेकांना भेटतात

Avatar photo

Published

on

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट

एका पुरस्कार सोहळ्यात गायिका सावनी रविंद्रने सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सावनीने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. सावनीच्या चाहत्यांनी ‘दोन‌ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका जेव्हा भेटतात’ अश्या कमेंट्स करून त्यांनी सावनीला खूप शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र या भेटी विषयी सांगतात, “माझ्यासाठी हा क्षण स्वप्नवत होता. कारण, आजपर्यंत लहानपणापासून श्रेयाजींची हजारो गाणी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. मला नेहमीच त्यांच्या विविध भाषेतील गाण्यांचं आकर्षण होतं. लता दीदींनंतर श्रेया घोषाल यांना मी माझा आदर्श मानत आले आहे. त्यांच्या हिंदी व्यतिरिक्त तेलुगू मल्याळम अश्या भारतीय भाषेतील गाण्यांची मी पारायणं केली आहेत. मी त्यांची गाणी ऐकून त्या भाषा शिकण्याचा आणि त्या भाषांमध्ये गाण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मला त्या एका भेटीत आठवल़ं की आपण त्यांची गाणी एका लूपवर खूप वेळा ऐकलीत आणि त्या खुद्द आपल्या समोर आहेत.”

पुढे सावनी सांगते, “मला भरून आलं जेव्हा त्या मला स्वतःहून म्हणाल्या, की येस, मी तुला ओळखते, तुला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हा मी तुला गुगल केलं. तिथे तुझ्याबद्दल संपूर्ण माहिती वाचली. तुझी गाणी ऐकली. तुला ज्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणं खूप शोधलं. पण मला सापडलं नाही. तेव्हा मी म्हटलं तो सिनेमा अजून प्रदर्शित झालेला नाही. त्यावर त्या म्हणाल्या, तो सिनेमा लवकर प्रदर्शित करा. मी फार उत्सुक आहे ते गाणं ऐकण्यासाठी. तेव्हा मला आनंदाने गहिवरून आलं. श्रेया जी इतक्या मोठ्या गायिका आहेत. पण तरीही त्या फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी आठवणीत राहणारा होता. माझ्यासाठी ती भेट म्हणजे फॅन मोमेंट होती.”

Uncensored मराठी

Sri Lanka crisis – श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकट; आणि राष्ट्रध्यक्ष अज्ञातवासात

Avatar photo

Published

on

Kalyani Gilbile, 12th July 2022:

गंभीर आर्थिक संकटाच्या जाळ्यात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा यामुळे लाखों संख्येने लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहे. एवढेच, नव्हेतर शनिवारी असंख्य आक्रमक नागरिकांनी राष्ट्रध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानांच्या घरात घुसून ताबा मिळवला आणि पंतप्रधानाच्या शासकीय निवासस्थाला आग लावली.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यानी देश सोडून पलायन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणांकडून अद्याप असा कोणताही खुलासा झालेला नाही आहे. राष्ट्रपती गोटाबाय यांनी अजूनतरी औपचारिकपणे राजीनामा दिला नसून ते अज्ञातवासात आहे, असे म्हटले जात आहे.   

श्रीलंकेची अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच झाली असून या देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे  तळागाळाला गेली आहे. श्रीलंकेतील सरकार जनतेच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकली नाही, असे दिसून येते. श्रीलंकेची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु करोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन जवळजवळ ठप्प होते. तसेच, गेल्या वर्षी राजपक्षे सरकारने पूर्णपणे जैविक शेती करण्याचे जाहीर करून कोणतीही पूर्वतयारी न करता सर्वप्रकारचा शेतीमाल आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे देशातील कृषी उत्पादनांवर वाईट परिणाम झाला आणि अपुऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामुळे प्रचंड महागाई वाढून साठेबाजीला सुरुवात झाली. आणि साठेबाजीला नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहिर करून जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला.         

Continue Reading

Uncensored मराठी

मुंबई आणि गोव्यात दोन जणांची दगडाने हत्या केल्याप्रकरणी कचरा वेचकाला पोलिसांकडून अटक

Avatar photo

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 7th June 2022

मुंबई आणि गोवा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दगडांनी डोके फोडून दोन पुरुषांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 23 वर्षीय कचरा वेचणाऱ्या युवकाला सोमवारी अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरज रामसेवक यादव याने 21 जूनच्या पहाटे गिरगाव चौपाटीजवळ अचानक झालेल्या वादानंतर गजानन रामचंद्र पवार (55) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे. 

“आम्हाला वांद्रे येथे यादवचे सीसीटीव्ही फुटेज सापडले एका स्वयंसेवी संस्थेने बेघरांना मोफत जेवण दिल्याच्या ठिकाणी तो पोहोचला तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पवारांची हत्या केल्याची कबुली दिली आणि गोव्यात एका व्यक्तीची दगड ठेचून हत्या केल्याचेही कबूल केले,” असे अधिकारी म्हणाले.

Continue Reading

Uncensored मराठी

दिंडोशी मेट्रो स्थानकाचे नाव पठाणवाडी करावे याप्रकरणी एमएमआरडीएला हायकोर्टाचे आदेश, दोन आठवड्यात प्रतिज्ञा सादर करण्याची मागणी

Avatar photo

Published

on

पश्चिम उपनगरातील मेट्रो-७ वरील स्थानकाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावरील मेट्रो स्थानकाचे नाव दिंडोशी ऐवजी पठाणवाडी करावे अशी मागणी करत ’नई रोशनी’ या  सेवाभावी संस्था करत आहे. ऍडव्होकेट अल्ताफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र, याचिकेवर सुनावणी हवी असल्यास १६ जूनपर्यंत एक लाख रुपये जमा करा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने संस्थेला दिले आहेत. खंडपीठाने याप्रकरणी दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे एमएमआरडीएला आदेश देण्यात आले आहेत. 

२०१० मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, २०२० दरम्यान राजकीय दबावापोटी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्थानकाचे नाव दिंडोशी केले. एमएमआरडीएच्या नियमानुसार, एखाद्या ठिकाणी दोन मेट्रो स्थानकं येणार असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नावं देण्यात येते. त्यासाठी तेथील वाडी, पाडे यांचा विचार केला जातो. मेट्रो २ मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो ७ च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

दुसरीकडे, मेट्रो स्थानक जवळ एक उड्डाणपूल असून तो पठाणवाडी या नावाने ओखळला जातो. तेथील बेस्टच्या थांब्यालाही पठाणवाडी हेच नाव आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाला सुद्धा पठाणवाडी असे नाव द्यावे अशी याचिकेतून विनंती करण्यात आली आहे. दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणतः दीड किलोमीटर लांब असल्यामुळे या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. तसेच, स्थानकाच्या नावामुळे त्यांची गफलत देखील होऊ शकते, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

सदर याचिकेवर गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकाकर्त्यांनी एक लाख रुपये अनामत रक्कम भरल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच, न्यायमूर्तीनी याची दखल घेत एमएमआरडीएच्या ऍड. अक्षय शिंदे यांना प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

Continue Reading

Trending