मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना तसेच मुंबईतील विकासकांचे घोटाळे आपल्या परिचयाचे आहेतच; अशाच एका गुन्ह्याचा तपास माटुंगा पोलीस करत आहेत.
Akash Sonawane (Sub-Editor) Mumbai Uncensored :
माटुंगा पोलिस ठाणे : खार पश्चिम येथे राहणारा अमित नरेंद्र दोषी (वय ४७) हा आदिनाथ डेव्हलपर्स या नावाने बांधकाम व्यवसाय करीत असून त्या मार्फत मुंबई मध्ये माटुंगा, दादर, वरळी इ. ठिकाणी इमारतींचे पुनर्वसन करत असल्याचे वैभव विजय सावंत यांना सांगून संबंधित इमारतीमध्ये स्वस्त दरात फ्लॅट मिळवून देण्याचे तसेच १९ व्या मजल्याची परवानगी नसताना सुद्धा तेथे सदनिका देण्याचे आमिष दाखवून खोटे दस्तऐवज बनवून सावंत यांची दिशाभूल करून २.६० कोटींची फसवणूक केली.
सदर आरोपीस माटुंगा पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०६, ३४ सह भा.द.वि. कलम ३, ४, ५, ८, १३ MOFA अन्वये गुन्हे नोंदवून दि. २७/१२/२०२१ रोजी अटक केली असता न्यायालयाकडून दि. ३१/१२/२०२१ रोजी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
दरम्यान पुढील तपास सुरु असताना अमित दोषी याच्यावर २०१६ मध्ये, डॉ विजय पटणी (वय ७२) यांच्यासोबतही अशाच प्रकारचे आमिष दाखवून ८१ लाख रुपये लुबाडल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. डॉ पटणी हे अमित दोषी चे फॅमिली डॉक्टर असून त्याच्या आई वडिलांचे उपचार त्यांच्याकडे सुरु होते. दरम्यान डॉ पटणी यांना दादर येथील रामगुफा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये पुनर्विकास करत असल्याचे सांगून त्यांच्याकडूनही तब्बल ८१ लाख रुपये लुबाडले होते; परंतु पुढील बाबींसाठी विलंब झाल्यामुळे डॉ पटणी याना संशय आला आणि त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
Matunga Police Station
सदर आरोपाखाली अमित नरेंद्र दोषी याला पोलीस उप-निरीक्षक अमोल सावंत यांनी भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ तसेच कलम ३, ४, ५, ८, १३ मोफा अन्वये दि. ०६/०१/२०२२ रोजी पुन्हा अटक केली असून न्यायालयाकडून १०/०१/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याची आई चारुल नरेंद्र दोषी आणि वडील नरेंद्र दोषी हे देखिल सदर गुन्ह्यात सामील आणि फरार असून त्यांचा शोध सुरु आहे .
मुंबईसारख्या शहरांमध्ये सद्यस्थिती अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडत असतात दरम्यान प्रयत्नशील पोलीस प्रशासन न्याय देण्यास तत्पर असल्यामुळे सर्वसामान्य जनता अशा समाज कंटकांपासून सुरक्षित आहे.
गंभीर आर्थिक संकटाच्या जाळ्यात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा यामुळे लाखों संख्येने लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहे. एवढेच, नव्हेतर शनिवारी असंख्य आक्रमक नागरिकांनी राष्ट्रध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानांच्या घरात घुसून ताबा मिळवला आणि पंतप्रधानाच्या शासकीय निवासस्थाला आग लावली.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यानी देश सोडून पलायन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणांकडून अद्याप असा कोणताही खुलासा झालेला नाही आहे. राष्ट्रपती गोटाबाय यांनी अजूनतरी औपचारिकपणे राजीनामा दिला नसून ते अज्ञातवासात आहे, असे म्हटले जात आहे.
श्रीलंकेची अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच झाली असून या देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे तळागाळाला गेली आहे. श्रीलंकेतील सरकार जनतेच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकली नाही, असे दिसून येते. श्रीलंकेची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु करोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन जवळजवळ ठप्प होते. तसेच, गेल्या वर्षी राजपक्षे सरकारने पूर्णपणे जैविक शेती करण्याचे जाहीर करून कोणतीही पूर्वतयारी न करता सर्वप्रकारचा शेतीमाल आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे देशातील कृषी उत्पादनांवर वाईट परिणाम झाला आणि अपुऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामुळे प्रचंड महागाई वाढून साठेबाजीला सुरुवात झाली. आणि साठेबाजीला नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहिर करून जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला.
Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 7th June 2022
मुंबई आणि गोवा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दगडांनी डोके फोडून दोन पुरुषांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 23 वर्षीय कचरा वेचणाऱ्या युवकाला सोमवारी अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
डीबी मार्ग पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सूरज रामसेवक यादव याने 21 जूनच्या पहाटे गिरगाव चौपाटीजवळ अचानक झालेल्या वादानंतर गजानन रामचंद्र पवार (55) नावाच्या व्यक्तीची हत्या केली आहे.
“आम्हाला वांद्रे येथे यादवचे सीसीटीव्ही फुटेज सापडले एका स्वयंसेवी संस्थेने बेघरांना मोफत जेवण दिल्याच्या ठिकाणी तो पोहोचला तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पवारांची हत्या केल्याची कबुली दिली आणि गोव्यात एका व्यक्तीची दगड ठेचून हत्या केल्याचेही कबूल केले,” असे अधिकारी म्हणाले.
पश्चिम उपनगरातील मेट्रो-७ वरील स्थानकाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावरील मेट्रो स्थानकाचे नाव दिंडोशी ऐवजी पठाणवाडी करावे अशी मागणी करत ’नई रोशनी’ या सेवाभावी संस्था करत आहे. ऍडव्होकेट अल्ताफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र, याचिकेवर सुनावणी हवी असल्यास १६ जूनपर्यंत एक लाख रुपये जमा करा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने संस्थेला दिले आहेत. खंडपीठाने याप्रकरणी दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे एमएमआरडीएला आदेश देण्यात आले आहेत.
२०१० मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, २०२० दरम्यान राजकीय दबावापोटी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्थानकाचे नाव दिंडोशी केले. एमएमआरडीएच्या नियमानुसार, एखाद्या ठिकाणी दोन मेट्रो स्थानकं येणार असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नावं देण्यात येते. त्यासाठी तेथील वाडी, पाडे यांचा विचार केला जातो. मेट्रो २ मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो ७ च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
दुसरीकडे, मेट्रो स्थानक जवळ एक उड्डाणपूल असून तो पठाणवाडी या नावाने ओखळला जातो. तेथील बेस्टच्या थांब्यालाही पठाणवाडी हेच नाव आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाला सुद्धा पठाणवाडी असे नाव द्यावे अशी याचिकेतून विनंती करण्यात आली आहे. दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणतः दीड किलोमीटर लांब असल्यामुळे या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. तसेच, स्थानकाच्या नावामुळे त्यांची गफलत देखील होऊ शकते, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
सदर याचिकेवर गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकाकर्त्यांनी एक लाख रुपये अनामत रक्कम भरल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच, न्यायमूर्तीनी याची दखल घेत एमएमआरडीएच्या ऍड. अक्षय शिंदे यांना प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.